Thursday, May 29, 2014

न्याय व समतेसाठी लढण्याचे बळ घेऊनी आम्ही चाललो

                                           

 लॉन्ग मार्च - अनुभव 1 
न्याय व समतेसाठी लढण्याचे बळ घेऊनी चाललो आम्ही....

                                     
                                  
08 मे ला सकाळीच संजय दाभाडे यांचा फोन आला. दुपारी 4 वाजता माणुसकी या संस्थेमध्ये महत्त्वाची बैठक आहे म्हणून.. 6 मे लाच मानवी हत्या विरोधी समिती तर्फे सारस बाग ते शनिवारवाडा मुक मोर्चा काढला होता. 4 वा सुरू झालेली मिटींग 2 तासाने संपली. बाहेर पडताना सर्वांच्या चेहऱ्यावर लढण्याची जिद्द व तयारीची धावपळ जाणवायला सुरूवात झाली होती. काहीतरी ठरलं होतं, काही तरी घडत होतं, अत्याचार होत आहेत त्यावर काम कसं करायचं या माझ्या सारख्या कितीतरी सहकार्यांना पडणाऱ्या पश्रांचं उत्तर भेटत होतं. वारंवार बैठका होत होत्या कामाचं नियोजन ठरत होतं. कामाचं वाटप झालं होतं. मी पत्रकारितेचा विद्यार्थी  असल्यामुळे माध्यमांची जबाबदारी आमच्यावर होती. माध्यमातील लोकांच्या भेटीगाठी घ्यायला सुरूवात झाली होती. फेसबुक वर काम चालू होतं. माध्यमं दिलेल्या प्रेसनोट कडं दुर्लक्ष करत होती तरी सतत प्रेसनोट देणं चालू होतं. मुंबईला जाऊन पत्रकारांच्या, चळवळीतील लोकांच्या भेटी झाल्या. 


                                           शेवटी 22 मे ला ज्यासाठी ही सर्व धावपळ चालू होती तो दिवस उजडला होता. सकाळी 8 वाजताची वेळ. समता भूमा म्हणजे ज्योतीराव फुल्यांचे निवासस्थान.. पुण्यातील डाव्या दलित व सामाजिक चळवळीतील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने समता भूमित जमत  होते. कारण होतं 08 मे च्या बैठकीत ठरल्या नुसार महाराष्ट्रात वाढत असलेल्या दलित अत्याचारांच्या घटना बंद व्हाव्यात. सरकारने कडक पावले उचलावीत, कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी. यासाठी पुणे ते खर्डा लॉन्ग मार्च काढायचा. दलितांच्या अत्याचाराकडे व हक्कांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला जाब विचारायचा. व खर्ड्यामध्ये संसद भरवायची कारण या देशाच्या संसदेत दलितांचे प्रश्र मांडले जात नाहीत. नक्कीच या सगळ्याला किनार होती नितीन आगेच्या क्रुर हत्येची.
                                           

लॉन्ग मार्च ला सुरूवात झाली पु्ण्याच्या बाहेर पडे पर्यंत पुण्यातील सहकारी मोठ्या प्रमाणात सहभागी होते. पुण्याच्या बाहेर पडल्यावर मात्र आम्ही पूर्ण अंतर पायी चालत जाणारे 20 ते 25 जण होतो. आज फक्त या माझ्या सहकार्यांबद्दल लिहीणार आहे. ज्यांनी या लॉन्ग मार्च मध्ये सहवास दिला. त्यांचे विविध  पैलु जाणवले. सर्व वैयक्तिक ऐहिक सुख बाजूला ठेऊन 45 डिग्री तापमानात चालणारे हे लोक एका वेगळ्या ध्येयाने भारावले होते. जातीअंन्त, न्याय व समता या ध्येयासाठी हे चाल त होते. काही जण पुणे, लातूर, बीड, गोवा, मुंबई, आंबाजोगाई येथून तर काही दिल्लीवरून सहभागी झाले होते. काही पत्रकार, काही वकील, काही डॉक्टर, काही समाजसाठी पूर्ण वेळ काम करणारे, काही शिक्षक, काही रंगकाम करणारे, तर काही केटरर व  विद्यार्थी. च्या कामात काम करून पोट भरणारे. काय गरज होती यांना याची उत्तर भेटली, ती लिहीन पुढे कधीतरी.
                                           

 बीड वरून  रंग काम करणारा एक जण सहभागी होता. पुस्तकी शिक्षण जरी पूर्ण झाले नसले तरी त्याचे सामाजिक शिक्षण मात्र चांगल्या प्रकारे झाले होते. हातावरचे पोट पण त्यात देखील समाजासाठी काही करण्याची जाण त्यांच्या दिसत होती.  अभिजीत गडकर, चांगलं स्थिर झालेलं जीवन. पण दलितांवरील अत्याचार काही स्वस्थ बसू देत नव्हते. विशेष म्हणजे  हद्याची ओपन हर्ट सर्जरी झालेला हा माणूस 7 दिवस 250 किलोमीटर दलित समाजाला न्याय मिळावा म्हणून आमच्या सोबत चालत होता. 
                                              

गोव्यावरून रूपेश पाटकर व वसुधा सावरीकर सहभागी झाले होते. तसेच दिल्लीवरून देखील काही विद्यार्थी सहभागी झाले होते. यांच्या सहभागामुळे या मार्च ला राष्ट्रीय मार्च चे स्वरूप प्राप्त झाले. 
                                              


                  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या मार्च मध्ये स्वंयस्फूर्ती ने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पक्षाचे राज्यसचिव अशोक ढवळे फुले वाड्यात उपस्थित होते. त्यांनी पक्षाच्या वतीने या मार्च ला जाहीर पाठिंबा दिला. कॉ. किरण माघे, पुणे जिल्हा सचिव मिलिंद सहस्त्रबुध्दे, आंबाजोगाईचे कॉ. बाबासाहेब सरवदे, पुण्यातील संजय दाभाडे, विणकर सर  व आम्हांला ज्यांचा 7 दिवस सहवास लाभला ज्यांचे विचार ऐकायला भेटले ज्यांच्या मुळे प्रेरणा मिळाली ते कुमार शिरारकर. 56 इंच छाती असल्याचे दाखवून काही जण देशाचे प्रंतप्रधान बनले, पण त्यांचं तारूण्या मला कधी स्टेजवरील सभांमधीव खोट्या भाषणांपलीकडे दिसले नाही. 
                                          

  पण कधीही गाजावाजा न करता आदिवासी भागात  आपलं काम करणारे आमचे कुमार सर आमचे प्रेरणास्थान बनले. वयाने जरी ते मोठे असले तरी ते विचाराने व मनाने आमच्या सर्वांपेक्षा तरूण आहेत. मी सतत म्हणायचो की आपल्याल तरूणाईची व्याख्या करावी लागेल, सरांच्या सहवासात ती मला जाणवली सापडली.  सर तुम्ही आम्हांला खरंच या 7 दिवसात जीवना कडं, संघर्षाकडं, सामाजिक प्रश्र व लढे यांचा कडं पाहण्याची दृष्टी दिलीत. 



                                        

मास मुव्हमेंटचे गोतम, विजय, शुभम, मोरेश्वर, अक्षय, नितीन, विकास व आकाश सहभागी होते. यांच्या कडून शिकण्यासारखं खूप काही मिळालं. फिल्म इन्स्टिटयुट अक्षय आणि क्षमा या मार्च वर फिल्म तयार करत आहेत त्यामुळ ते दोघेही सोबत होते. लवकरच ही शॉर्ट फिल्म आम्हाला पहायला मिळेल. या दोघांनी या ऐतिहासिक दलितांच्या आदिवासींच्या संघर्षाला कॅमेराबध्द करण्याचं काम केलंय. हा खरा इतिहास व लढा जपला पाहिजे. या  फिल्म मधून हा 7 दिवसात दिसलेले विदारक वास्तव समोर येईलच. केटरर च्या हाताखाली जेवण वाढूण उदरनिर्वाह करणार दिगंवर, आबेंडकर पुतळ्याजवळ सभा चालू असताना असा लॉन्ग मार्च निघतोय समजल्यावर लगेच सामील झालेला असा हा दिगंबर. सगळ्यांचीच कथा वेगवेगळी आहे. 



                                        टाटा इन्स्टिटयुट मधील प्रमोद, अक्षय, फिरदोस हे विद्यार्थी व प्राध्यापिका  economic and political weekly या मासिकाच्या लेखिका बेला भाटिया आमच्या सोबत होत्या. 
पुणे विद्यापीठातील सचिन व देवकुमार (नवभारत) तसेच लोकायतचा वरद व सहकारी सोबत होते. त्यांच्या सोबत सतत चर्चा व्हायच्या. नवीन गोष्टी कळायच्या विचारांचे मार्ग जाणवायचे. 


आमच्या दोन्ही गाड्यांचे चालक जे फक्च चालक नव्हते तर ते आमचे कार्यकर्ते बनले होते.  मालकाने निघताना सांगितले होते बालाजील जायचंय आणि आले इकडं लॉन्ग मार्च लाॉ. पण मार्च संपल्यावर म्हणाले खरा बालाजी पाहायला मिळाला. 

                                      
शेवटी रानडे इन्स्टिटयुटचे माझा जवळचे मित्र व सहकारी  जे मला व एकमेकांना लढण्याची ऊर्जा देतात व  ज्यांच्या शिवाय हा मार्च पूर्ण नसता झाला ते  प्रविण व स्नेहा ( कायद्याची विद्यार्थीनी) , सुनिल , योगेश,  कुणाल आणि मी 7 दिवस सहभागी होतो.
                                          





सांगण्यासारखे खूप काही आहे. लवकरच लिहीन. काही भयानक वास्तव आपल्या समोर मांडेन. काहींना पटेल काही जण वाद घालतील, पण स्वताच्या  डोळ्यांनी अनुभवलेले दलित आदिवासी श्रमिकांचे वास्तव कोणी कितीही वाद घातले तरी बदलणार नाही, तर ते सोडविण्याकडं लक्ष दिलं किंवा लढा उभारला तर वाद देखील लाज वाटून घेणार नाही. 

                                         आज हे लिहीण्याची गरज यासाठी की, या ऐतिहासिक लॉन्ग मार्च मध्ये जे सहभागी होते, त्यांना ना प्रसिध्दी चा गरज आहे ना पाठ ठोपटून घेण्याची, त्यांनी त्यांचं कर्तूत्व सिध्द करून दाखवलं आहे. फक्त त्यांच्या नावाचा विसर कोणाला पडू नये म्हणून हा खटाटोप. कारण इतिहास बदलणं हा काहींचा जन्म सिध्द आधिकार आहे. तर मार्च मध्ये सहभागी झालेल्यांचे दुर्लक्ष केलेल्या कडे दुर्लक्ष करून लढणं हे सामाजिक विवेकपूर्ण कर्तव्य आहे व तो करत राहतील पण इतिहा, लिहीलाच पाहिजे ना....

1 comment:

  1. Hi chan vatal tuze blogs vachun perfect patrakarita shikat aahes. must vishesh taha lang march che anubhav an election che likhan ekdam must aake keep it up.

    ReplyDelete